Posts

Showing posts from 2015

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
ब्रेक हवाच! ब्रेक - हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत सहजपणे वापरला जातो. गाडीमधे असलेल्या ब्रेकला तर मराठीत पर्यायी शब्द शोधणे कठीण जाईल. पण हा शब्द आणखी एका छानश्या संदर्भात वापरला जातो. आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीक्षेत्रात कामे करीत असताना त्यात पार गुरफटून गेलेला असतो. कधी कधी ही कामे इतकी अंगवळणी पडतात की त्यामधील आकर्षण देखील संपून गेलेले असते. अनेक लोक तर यांत्रीकपणे काम करीत असताना दिसतात. तेच तेच काम करुन कदाचित अशी यांत्रीकता येत असावी. काही लोक काचेच्या पेटीत बसून पैश्यांची देवाण घेवाण करतात तर काही महिनाअखेरपर्यंत आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी धडपडत राहतात. काही लोक वस्तू विकण्यासाठी गावोगाव प्रवास करतात तर काही मंडळी आपापल्या वर्गांमधे विद्यार्थ्यांना शिकवित राहतात. काही लोक कोर्टामधे लोकांच्या वतीने भांडत राहतात तर काही दिवसभर आजारी लोकांना तपासून त्यांचे आजार बरे करीत असतात. काही लोक लोकलच्या डब्यांमधे लटकत प्रवास करतात तर काही मोटरसायकलवरुन हजारो किलोमिटर फिरतात. काही कारमधून आपल्या कार्यलयात जातात तर काही लोक पायदळ आपल्या शेतांमधे जातात. काम करणारी प्रत्येक व्यक्ती ज

Article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मला एकटे रहायचेय काकुळतीला येऊन ती म्हणाली, मला कृपया एकटे रहायचेय. यावेळी मला कुणीही माझ्या जवळ नकोय. मला कुणीही समजावू नका, कुणी आधारही देऊ नका. माझ्याबद्दल सहानुभूती तर दाखवूच नका. मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. तेच तेच बोलून बोलून, तेच तेच करुन करुन मला आता खरोखरीच वीट आलाय. तुमची अती काळजी करणे देखील मला आता नकोसे झालेय. गंभीर चेहेरे करुन तुम्ही मला समजविण्याचा प्रयत्न करताय, माझ्या काळजीपोटीच हे सारे तुम्ही सर्वजण करताय हे मला कळतंय. पण तरीही आत्ता या क्षणी मला कुणीही जवळ नकोय. अगदी प्रेमाचं देखील कुणी नकोय. मला माझ्या स्वतःसोबत राहायचे आहे. मला विचारशून्य व्हायचे आहे. प्लीज, लीव्ह मी अलोन. सर्वांना हात जोडून ती विनवणी करीत होती. तिच्या जवळच्या लोकांना कळेचना की ही असे काय म्हणते आहे. तिच्या अश्या विनवण्यांमुळे स्वाभाविकच तीव्र प्रतिक्रीया उमटायला लागल्या. हिचे हे वागणे तर फारच विचित्र आहे. एव्हडा मोठा आघात हिच्या आयुष्यात झाला. आयुष्य अक्षरशः उध्वस्त झाल्यागत स्थिती झालीय. आम्ही सर्व जवळचे हिला आधार देण्यासाठी आलोय. हिच्या भविष्याचा विचार आम्ही सर्व करतोय आणि हिचा हा काय

Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मुखवट्यांची प्रामाणिकता कला शाखेच्या अंत्य वर्गातील विद्यार्थिनींना मी मागच्या आठवड्यात एक कविता शिकवित होतो. त्या इंग्रजी कवितेमधे माणसाला जगताना धारण करावी लागणारी वेगवेगळी रुपे वर्णन केलेली आहेत. कवी त्यात असे म्हणतो की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगानुरुप आपण वस्त्र परीधान करतो त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे मुखवटे देखील धारण केलेले असतात. या सर्व मुखवट्यांच्या गर्दीमधे आपला मूळ मुखवटा कसा आहे हे कळतच नाही. त्या मूळ मुखवट्याचा शोध हाच खरेतर आत्मज्ञानाच्या दिशेचा प्रवास आहे. अश्या पद्धतीचे ते सारे वर्णन होते. कवितेचा अर्थ कवीला साधारणपणे जसा अपेक्षित होता तसा मी सांगितला परंतू माझ्या गुरुंनी मला दिलेल्या अध्यापनाच्या मूलतत्वानुसार मी माझ्या विचारी विद्यार्थीनींना या कवितेच्या मर्माबद्दल बोलण्यास सांगितले. त्या बोलायला लागल्या. सर्वांचे छान छान विचार मी ऐकीत होतो तेव्हड्यात माझ्या एका विद्यार्थी मैत्रीणीने मलाही विचार करायला लावणारे मत मांडले. ती मला म्हणाली की सर, या कवितेतील मांडणी तथ्यांवरच आधारीत आहे. आपल्याला वेगवेगळे मुखवटे लावूनच वावरावे लागते कारण आपण सामाजिक व्यवस्थांमधे वावरतो

Article published under थोडा है थोडे की जरूरत है

Image
परीक्षा..आपल्यालाच जाणून घेण्याची देशातील उच्च शिक्षण प्रक्रीयेमधे येणाऱ्या काळात काही महत्वपूर्ण बदल संभवतात. या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच महाविद्यालयासाठी सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे - महाविद्यालयाचा दर्जा. प्रत्येक महाविद्यालय आपल्या दृष्टीने आपले वेगळेपण राखून असते. प्रत्येक महाविद्यालयाची कार्यशाली आणि वातावरण देखील वेगवेगळे असते. महाराष्ट्रामधे फार मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्थांद्वारा चालविली जाणारी महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालये फारज मोजकी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठ्या व जुन्या काळापासून कार्यरत असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांद्वारे चालविली जाणारी वेगवेगळी महाविद्यालये राष्ट्रीय पातळीच्या मानकानुसार तपासून त्याचे मुल्यांकन केल्या जाण्याची प्रक्रीया जवळपास वीस वर्षांपासून सुरु झाली. सुरुवातीला या अश्याप्रकारच्या मानकांची गरज कुणालाही न भासल्याने फार कमी महाविद्यालयांनी या प्रक्रीयेमधे सहभाग दिला. परंतू शिक्षणातील स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचल्याने आता भारतीय उच्च शिक्षण पद्धतीमधे बदल करण्याची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली. या प्रक्रीय

My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
माझी डीग्री...वीस रुपये किलो! त्याची माझी पहिल्यांदा भेट केव्हा झाली ते आठवत नाही पण एक चांगला भाजीवाला म्हणून मी त्याच्या दुकानात कधीपासून जायला लागलो हे मात्र नक्की आठवतंय. साधारण दहा वर्षांपूर्वी माझ्या घराजवळ असलेल्या भाजीवाल्याचे दुकान बंद असल्याने सहजच मी त्याच्या दुकानावर पोहोचलो. भाजी देताना त्याचे माझ्याकडे लक्ष देणे मला फार भावले. मी योग्य भाजी निवडली आहे की नाही याची तो काळजी घेत होता. भाजीपाल्यातील मला फार काही कळत नाही हे एक मिनीटात समजल्यावर खरे तर माझ्यासारखे ग्राहक काही दुकानदारांसाठी फायद्याचे असतात. जमेल तसा इतर लोकांनी काढून टाकलेला माल माझ्यासारख्यांच्या माथी मारणे अतिशय सोपे असते. परंतू हा मात्र वेगळा होता. मी निवडलेल्या भेंड्यांमधून अर्ध्या त्याने बाजूला काढल्या व चांगल्या निवडून मला दिल्या. मला त्याचा हा वेगळेपणा चटकन लक्षात आला. इतकेच नव्हे तर तो अतिशय चांगल्या भाषेत संवाद करीत होता. बोलता बोलता मधेच इंग्रजी शब्दांची पेरणी देखील तो करीत होता. त्याचा भाजी देण्याबद्दलचा प्रामाणिकपणा व त्याची भाषा या दोन्ही बाबींचा विचार करुन मला त्याच्याबद्दल सहाजिकच कुतुहल निर्

Article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सामर्थ्य या संवादास दे... दोन पिढ्यांमधील संवाद हे कधी सुसंवाद तर कधी विसंवाद असतात. हा नियम कोणत्याही ठराविक पिढ्यांच्या जोडीला लागू पडतो असे नाही. प्रत्येकच दोन पिढ्यांमधे हा प्रकार आढळतो. फरक पडतो तो केवळ विषयांचा, गरजांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा. बाकी विचारांचे वेगळेपण हे स्वाभाविकपणे राहतेच. असाच एका बाप व लेकी मधला पत्ररुपी संवाद मला वाचायला मिळाला. हे दोन्हीही संवाद एकमेकांना दिलेली उत्तरे नाहीत तर स्वतंत्र मते आहेत. मी या पत्रांचा वाचक म्हणून या दोन्हीही मतांच्या मधे उभा राहून माझे मत तपासून घेतोय. लेकीचा पत्ररुपी संवाद: बाबा, तुम्ही मला जरा समजून घ्यावे असे मला वाटते. मी आत मोठी झालेय हे प्रथम तुम्ही तुमच्या मनाला पटवायला हवे. मी आता अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाबा मला सोळावं वर्ष लागलंय. आता मला काही निर्णय माझ्या मनाने घेऊ द्या ना. मला ठाऊक आहे की तुम्हाला माझी फार काळजी वाटते आणि मला हे देखील ठाऊक आहे की ही काळजी तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच निर्माण होत असते. पण बाबा, मला आता तुमचे काळजी करणे बंधन वाटायला लागले आहे. मला तुम्ही मोबाईल फोन देणार नाही असे सा

Article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है about कट्यार काळजात घुसली

Image
सूर निरागस हो... सुबोध भावेचा नितांत सुंदर चित्रपट -कट्यार काळजात घुसली - बघण्याचा नुकताच योग आला. अभिजात शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर उभा असलेला हा चित्रपट प्रत्येकाला भरभरुन आनंद देतो. सुरांची ताकद काय असते, संगीतकला ही किती श्रेष्ठ दर्जाची कला आहे आणि सुरांचे पावित्र्य टिकविण्यासाठी माणसाला मनाचे पावित्र्य जपावे लागते हे या चित्रपटातून ठळकपणे मांडले आहे. परंतू अभिजात शास्त्रीय संगीताची ताकद हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला जाणविते. हे अभिजात शास्त्रीय संगीत कळत असो अथवा नसो, त्याचा परीणाम प्रत्येकाच्या मनावर झालेला जाणवितो. त्यामुळेच एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटांमधे काही लोक आरडाओरड करतात किंवा विचित्र कॉमेंट्स करतात. परंतू येथे असे काही होत नाही. संपुर्ण चित्रपट वेगवेगळ्या चिजांनी, बंदीशींनी, आलापांनी, नाट्यपदांनी नटलेला आहे परंतू त्याचे सादरीकरण व सुरांची ताकद इतकी जबरदस्त आहे की प्रत्येकजण भारावून चित्रपट बघत राहतो आणि त्या सुरांच्या वर्षावामधे चिंब भिजून निघतो. चित्रपटातील पंडीतजींच्या निरागस सुरांनी जणू मूळ सा पासून सुरु झालेला हा चित्रपट त्यांच्या शि

दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित माझा लेख "मामाचं हरवलेलं पत्र"

Image
मामाचं हरविलेलं पत्र साधारण तीस वर्षांपूर्वीचे एक चित्र: उन्हाळा जवळ यायला लागला की सर्वप्रथम जाणीव व्हायची ती म्हणजे परीक्षेची. परीक्षा आली की प्रत्येकाला तिचा ताण यायचाच. परंतू तो ताण घालविण्यासाठी आई-बाबांकडे एक छान गम्मत होती. ती गम्मत म्हणजे एक सुंदर स्वप्न. मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करायला लागली की आई म्हणायची, "बाळ आता छान अभ्यास करुन घे, मग परीक्षा आटोपल्यावर तुला मामाच्या गावाला जायचंय ना? मामाचं पत्र आलंय आणि त्याने आपल्याला बोलावलंय" हे वाक्य म्हणजे जणूकाही शब्दरुपी अमृत वर्षाच असायची. परीक्षेच्या धाकाने सश्यागत झालेलं मन त्या स्वप्नातील पूर्ण होणाऱ्या अनेक गोष्टींच्या केवळ आभासांनी पक्षागत उडायला लागायचं. परीक्षेचा तो अभ्यासाचा कालावधी त्या स्वप्नपूर्तीच्या विचारांनीच संपून जायचा आणि लगेच सारे भाऊ बहिण थेट पोहोचायचे आपल्या आजोळी. हे सारे तेथे पोहोचल्यानंतर तर काय गम्मत. एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास केवळ धमाल. कमी अधिक वयाची किमान दहा पोरे असायची. भल्या पहाटे उठणे, गावामधे त्या काळी नदी असायची आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातही ती वाहती असायची. नदीवर पोहाय

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळीची सुटी...कुणाची? "चला, आता शाळेला सुट्टी लागणार. जरा निवांत मिळेल. सारखे रोज तेच तेच. सकाळी उठा , धावपळ करा. शाळेची तयारी... ती देखील साधीसुधी नाही. केव्हडाली ती स्कूल बॅग...धावत धावत निघा, केव्हडे ते होमवर्क. शाळेचे वेगळे, ट्युशनचे वेगळे. सोबतच वेगवेगळे प्रोजेक्ट करा. हे सारे प्रोजेक्ट शाळेच्या वेळात होतच नाहीत. किती मेहनत करावी लागते. त्यात दर महिन्याला परीक्षा असतेच. चांगला नंबर यायलाच हवा. आता दोन दिवसानी दहा दिवस मस्त आराम मिळू शकेल. शाळेला सुटी लागली की छान वाटते. मोकळा वेळ मिळतो. जरा वाचन वगैरे करता येईल..." ही सारी वाक्ये शाळेच्या व पर्यायाने अभ्यासाच्या अती व्यस्त कार्यक्रमाला कंटाळून सुटीचा आनंद घेऊ इच्छीणाऱ्या शाळकरी मुलांचीच राहू शकतात असा आपला समज राहू शकतो. परंतू ही सारी वाक्ये मी शाळकरी मुलांच्या तोंडून नव्हे तर त्यांच्या शाळेच्या आणि अभ्यासाशी पूर्णपणे बांधल्या गेलेल्या मुलांच्या आयांकडून ऐकली आहेत.. रोज सकाळी प्रभातफेरी आटोपून मी घरी येत असतो आणि त्याचवेळी लहान शाळकरी मुले शाळेत जात असतात. नेहमी दिसणारे एक चित्र मला विचारात टाकते. साधारण चौथ्या वर्

My article published in Hindusthan Daily under थोडा है थोडे की जरूरत है

Image
वैचारिक आंदोलने.. सध्या आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरु आहेत. अचानक आपला समाज जागरुक झाला की ही मुळातच असलेली जागरुकता माध्यमांच्या मदतीने प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागली आहे हा देखील एका वेगळ्या चर्चेचाच विषय असू शकतो. परंतू ही एक चांगली नांदी आहे. जुन्या आणि नव्या विचारांच्या चर्चांमधूनच आपण भविष्यात एका चांगल्या आणि पोषक समाज व्यवस्थेकडे अग्रेसर होऊ. सध्याची मात्र एक फारच वेगळ्या प्रकारची संक्रमणावस्था प्रत्येकजण अनुभवतो आहे. प्रभावी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने एखाद्या विषयावरील दोन्ही बाजुचे विचार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या हे विचार प्रगटीकरण आपल्याला थोडेसे भडक, अतिरंजीत किंवा आत्मकेंद्री वाटत असले तरी हळूहळू या सर्व विचारमंथनाला एक दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विविध चर्चांमधून खरा समाजोपयोगी आधार निर्माण होऊ शकेल. अनेकांना सध्या या सर्व चर्चा वायफळ व वेळ वाया घालविणाऱ्या वाटत असतीलही परंतू त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपल्याला जाणवेल की या चर्चा विविध विषयांमधील लोकांचा सहभाग वाढवित आहेत. या सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढून देशाच्या विविध योजनांमधेही

My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है today

Image
विधात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण मुंबई शहरात २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटामधील काही गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्या ब्रेकींग न्युज म्हणून ही बातमी दाखवित होत्या. शिर्षक सर्वांचे सारखेच होते, मुंबई लोकल बॉम्बस्फोटांच्या पिडीतांना अखेर न्याय मिळाला. साधारण नऊ वर्षांनंतर हा निर्णय करण्यात आला. अर्थात या निर्णयाला पुन्हा वरील कोर्टात आव्हान दिले जाणार आहेच. त्यामुळे शिक्षेवर अंतीम शिक्कामोर्तब केव्हा होईल हे नक्की सांगता येत नाही परंतू सध्या शिक्षा सुनावण्यात आली ही समाधानाची बाब आहे. या सर्व प्रकारात एक बाब आणखी घडली. ती म्हणजे, यापैकी काही गुन्हेगारांना अमरावतीच्या कारागृहात बंदीस्त ठेवण्यासाठी आणण्यात आले. अमरावतीला त्यांना त्यांनी केलेल्या निर्घण कृत्यासाठी बंदीस्त ठेवले जाणार आहे व या कृतीमुळे विध्यात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. या अमरावतीशी ज्यांचा घनिष्ट संबंध होता, अनेक वर्षे ते अमरावतीकरच होते असे एक गृहस्थ या बॉम्बस्फोटामधे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूला कार

My article published in Hindusthan Daily under the column थोडा है थोडे की जरूरत है

Image
उदो बोला उदो!! कालपासून अमरावती शहरात अंबामातेचा-एकविरामातेचा -उदो बोला उदो- हा जयघोष सुरु झालाय. शहराच्या या ग्रामदेवतांचा जंगी उत्सव सुरु आहे. आता पुढील आठ-रात्री या शक्तीच्या प्रतीक असलेल्या मातांची मनोभावे पुजा केली जाणार, उपवास केले जाणार, पहाटे उठून अनवाणी मंदीरामधे जाऊन दर्शने घेतली जाणार, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलले जाणार, मातांची पुजा केल्यानंतर हाताला दोरे बांधले जाणार वगैरे वगैरे. एकंदरीत या शक्तीरुपी मातांवरील श्रद्धा जमेल तेव्हड्या तीव्रतेने व्यक्त करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार. अमरावतीच्या या श्रद्धास्थानांना मनोभावे भेटी देणाऱ्या भक्तांचे निरीक्षण केल्यास आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणविते, ती म्हणजे या ग्रामदेवतांचेच मानवी रुप घेऊन या पृथ्वीतलावर वावरत असलेल्या माता-भगिनींची संख्या या भक्तगणांच्या गर्दीत जास्त असते. विशेषतः शाळा, महाविद्यालयांमधे शिकत असलेल्या मुलींची तर संख्या फारच जास्त आढळते. एरवी पहाटे उठायला कंटाळा करणारी विद्यार्थिनी या नऊ दिवसांमधे पहाटे चार वाजता उठून, शुचिर्भुत होऊन, अनवाणी दोन किलोमीटर अंतर चालून मंदिरांमधे दर्शनाला येत

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सांगीतिक आनंद प्रवास मागील आठवड्यात पांढरकवडा या गावी १२३ वर्षे जुन्या गणेशोत्सवामधे व्याख्यानासाठी जाण्याचा योग आला. नेहमीप्रमाणे यवतमाळला मित्र मंडळींच्या भेटी घेऊन एका मित्रा समवेत पांढरकवड्याला जाण्यासाठी गाडीने निघालो. निघण्यापूर्वीच मित्राने सूचना केली की यवतमाळ ते पांढरकवडा हा रस्ता खूप खराब झाला आहे, मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालव. माझ्या ड्रायव्हींगवर माझा विश्वास असला तरीही मी जरा सावध झालो होतो. यवतमाळ गावातून निघतानाच एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कुणीतरी गाडी पार्क केल्यामुळे निर्माण झालेल्या रहदारीच्या खोळंब्यामुळे प्रवासाची सुरुवात ताणयुक्तच झाली. पण ताण कमी करण्याच्या दृष्टीने गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क करण्यामागे त्या गाडीवाल्याचे देखील काहीतरी लॉजीक असेल आणि ते लॉजीक समजावून घेण्यासाठी आपण आपले रक्त का जाळून घ्यावे असा विचार आम्ही दोघांनीही केला. पण प्रवासाची ही तर सुरुवात होती. अश्या प्रकारे ताण घेत प्रवास करण्यापेक्षा काहीतरी उपाय करावा हा विचार आम्हा दोघांच्याही मनात येतो न येतो तोच, माझ्या गाडीत नेहमी उपलब्ध असलेल्या सुंदर गाण्यांच्या

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
गेट टुगेदर रीझोल्युशन यशस्वी आयुष्य जगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो कारण यशस्वी आयुष्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या देखील वेगवेगळ्या असतात. असे असले तरीदेखील जो आनंदी आयुष्य जगतो व ज्याला आयुष्याच्या विविध क्षणांमधे आनंद शोधता येतो तो यशस्वी आयुष्य जगतो असे सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येईल. अर्थात आपले आयुष्य बरेचवेळा आपल्या सभोवताली असलेल्या समुहाच्या अस्तित्वावरही अवलंबून असते. काही लोक समुहामधेही त्रयस्थ राहतात तर काही या समुहाचा उपयोग सर्वांच्या आयुष्याला अर्थ निर्माण करुन देण्यासाठी करतात. मुळात दृष्टीकोन सकारात्मक असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाला यशस्वी आयुष्याच्या दिशेने पडणाऱ्या पावलामधे परावर्तीत करता येऊ शकते. एक असाच सुंदर प्रयत्न मला बघायला मिळाला आणि तो प्रयत्न किती परीणामकारक ठरतो आहे हे देखील मला कळल्यानंतर माझा त्याबद्दलचा आनंद द्विगुणित झाला आहे. सध्या सगळीकडे शाळेतील जुन्या बॅचेसच्या रीयुनीयनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आहेत. ही एक अतिशय चांगली बाब आहे. पंचेवीस किंवा पन्नास वर्षांनतर शाळेतील सर्व सवंगडी परत एकदा एकत्र भेटणार आणि काही वर्षांपू