Posts

Showing posts from 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मिसालें बनाई जाती है।... मिसालें बनाई जाती है बेटाजी, वो भुलाई नही जाती... एक महान कुस्तीपटू बापाच्या रुपात आपल्या मुलीला तिच्या जीवनातील सर्वात महत्वाचा संदेश देत असतो. पण तो संदेश आपल्या मुलीला देण्यासाठी त्याने व तो संदेश समजून घेण्यासाठी त्याच्या मुलीने जी जीवापाड मेहनत केलेली असते ती प्रत्यक्ष बघणे व त्याचा अनुभव करणे ही आपल्यासाठी व आपल्या घरातील मुलांबाळांसाठी एक सुवर्णसंधी ठरते.. ही सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होते ती हिंदी चित्रपट सृष्टीतील एक समर्पित अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानच्या नव्या व नितांत सुंदर अश्या दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून. प्रख्यात कुस्तीपटू महावीरसिंह फोगट व त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आपल्याला एक संपुर्णपणे वेगळा व मनाला भावणारा अनुभव देऊन जातो तो देखील अत्यंत संयतपणे व कुठेही लाऊड न होता. बरेच वेळा सामाजिक संदेश देणारे चित्रपट जरा अतिरंजीत वर्णने करुन संदेश समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतात किंबहुना झोपलेल्या समाजमनाला खडबडून जागे करण्यासाठी कधीकधी ती आवश्यकता देखील असते. परंतू आमीरखानचा दंगल चित्रपट मात्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
छोटीशी...पण फार मोठी गोष्ट!! या महिन्यात मला लौकीकार्थाने सामान्य परंतू कृतीने असामान्य असलेल्या तीन व्यक्तींना भेटण्याची व काही क्षणच संपर्कात येण्याची संधी मिळाली. या तीनही व्यक्तींचे कार्य बघता ते साधेपणात मोडणारेच होते. परंतू या व्यक्ती ती कामे करीत असताना ज्या गोष्टी प्रसरीत करीत होत्या त्या मात्र फार मोलाच्या होत्या. त्या गोष्टीहून महत्वाचे म्हणजे या गोष्टी सांगत असताना किंवा या गोष्टींचा प्रचार करताना त्यांनी त्याबाबत कुठलाही अभिनीवेश बाळगला नव्हता. अगदी सहजच त्या महत्वाच्या बाबी या व्यक्ती करीत होत्या. या व्यक्ती होत्या बोरे विकणारी काकू, चॉकलेट विकणारा दुकानदार व एका खानावळीचा मालक. सकारात्मकतेने आपल्या छोट्याश्या कार्यातून देशहिताचा प्रामाणिक प्रयत्न करणारे असे लोक बघितले की आपल्याला आपल्यातही सकारात्मक उर्जा जाणवू लागते. एकाच महिन्यात अश्या तीन व्यक्ती मला सापडल्या. पहिली होती बोरे विकणारी काकू. माहूर गडावरुन खाली उतरताना आबालवृद्धांना वेड लावणारी ती गोष्ट मला दिसली. उकडलेली बोरे. मस्त उकडलेली आणि मीठ लावलेली बोरे म्हणजे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आवडणारी गोष्ट असते.

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

Image
सकारात्मकता गमावणारी बुद्धीमत्ता आधुनिक काळात आपण सर्वजण आपल्या जीवनाची उलथापालथ करुन टाकणाऱ्या संक्रमणावस्थेतून प्रवास करीत आहोत. ही संक्रमणावस्था नव्या भौतिक जगताची तर आहेच परंतू त्यासोबतच नवी वैचारिक आंदोलने निर्माण करणारी देखील आहेत. हे नवे बदल आपल्यापैकी प्रत्येक विचारी मनाला विचार करायला बाध्य करतात. प्रसंगी या नवविचारांना व त्यामधून सामोरे येणाऱ्या बदलांना स्विकारताना आपली ओढताण देखील होत असते. एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच एका विशिष्ठ प्रकारची संभ्रमावस्था अनुभवतो आहे. परंतू माणूस हे परमेश्वराने निर्मिलेले एक असे अद्भूत रसायन आहे की कोणत्याही परीस्थितीमधे जगण्याचे वेगवेगळे मार्ग त्याला सापडतात व त्याद्वारे तो आनंद निर्मीती करु शकतो. अर्थात मानवाकडे असणारी ही सकारात्मकतेची क्षमता सर्वांनाच वापरता येते असे नाही. काही वेळा जीवनात अनुभवावी लागणारी संभ्रमावस्था नकारात्मक भुमिका निर्माण करताना आढळते. मानवाकडे असलेल्या अपरीमित बुद्धीमत्तेचा वापर काही मंडळी विविध बाबींमधील सकारात्मकता गमावण्यासाठी करताना दिसतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटू लागते. एखाद्या विषयातील बुद्धीमत्ता चांगल

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
लव्ह यू डियर जिंदगी आपल्याला वेगवेगळे आजार होतात तेव्हा आपण कसलाही संकोच न करता लोकांना त्याबद्दल माहिती देतो. ह्रदयाची समस्या आहे, किडनी खराब झाली आहे किंवा तत्सम आजार सांगितले जातात. तंत्रज्ञानाच्या जगात तर दवाखान्यात भरती होण्यापासून तर सुटी मिळण्यापर्यंतचे फोटो काढून सोशल मिडीयावर अपलोड केले जातात. परंतू विचारांच्या बाबतीत जर काही समस्या असेल व त्यासाठी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जायचे असेल तर मात्र समस्या निर्माण होते. त्याबद्दल अजिबात बोलायचे नाही असे ठरलेले असते. ज्याला तशी समस्या असेल तो किंवा त्याचे नातेवाईक फारच वेगळ्या पद्धतीने त्या समस्येकडे बघतात. कुणाला सांगायचे नाही, संशयात्मक वागायचे, खोटे नाटे सांगायचे व असे करुन त्याचा किंवा तिचा तो मनाचा आजार लपवायचा जेणेकरुन त्याला कुणीही वेडे ठरविणार नाही. एखाद्याला किती सहजच आपण वेडे ठरवितो, नाही? मनाचा आजार हा प्रत्येक वेळी थेट वेडेपणाच्या वर्गवारीत येत नसतो तर बहुतांश वेळी वागण्याचे संदर्भ जरा विस्कळीत झाल्याने किंवा ते न कळल्याने निर्माण झालेली ती संभ्रमावस्था असते जी फार कमी वेळात व योग्य मार्गदर्शनाने दूर केल्या जाऊ शकते...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
ह्युमनोटोपीया रविवारच्या दिवशी मी जरा दुपारी आराम करायचा ठरविला असतानाच आमचा चिरंजीव देवांग त्याच्यासोबत मी एक सिनेमा बघावा असा हट्ट करायला लागला. मी सुरुवातीला जरा उत्सुक नव्हतो. पण त्याच्या एका वाक्याने मला तो चित्रपट बघण्याची इच्छा झाली. मला त्याच्यासोबत चित्रपट बघण्याचा हट्ट करताना तो म्हणाला, बाबा! हा सिनेमा तुम्हालाही बघण्यासारखा आहे! या वाक्यावर मी चमकलो. मला बघण्यासारखा म्हणजे मोठ्यांना बघण्याचे चित्रपट कसे असतात हे तो समजतो आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय आहे ते बघायलाच हवे म्हणून मी चित्रपट बघायला बसलो. डीस्ने कंपनीचा चित्रपट होता व नाव देखील जरा वेगळे होते.. झुटोपीया. काय असेल या चित्रपटात याचा विचार करीत मी चित्रपट बघणे सुरु केले. देवांगने तो आधी एकदा बघितलेला असल्याने कोणत्या ठिकाणी काय विशेष आहे याबद्दलचे त्याचे समालोचन सुरु होते. सुरुवातीला जरा निरुत्साहानेच बसलेलो मी नकळत त्या चित्रपटात गुंतलो व चित्रपट संपला तेव्हा एक नितातं सुंदर चित्रपट बघितल्याचा आनंद प्राप्त झाला. चित्रपटाच्या नावाला सार्थ ठरविणारा एक अत्यंत कल्पक विचार यात मांडला होता. झुटोपीया म्हणजे झू (प

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
आई वडीलांचे छत्र माझा मित्र विनय व त्याची पत्नी खिन्नपणे बसले होते. फार वाईट वाटले होते त्यांना. मनाला वेदना झाल्यावर त्या कुणाजवळ बोलल्या की दुःख कमी होते म्हणून त्यांनी मला घडलेली घटना विषद केली. अर्थात ते सर्व सांगितल्यावर मी त्यावर काही उपाययोजना करावी, मुलांचे समुपदेशन करावे अशी देखील त्यांची अपेक्षा होती. घडलेला प्रकार मनाला व्यथित करणारा होताच परंतू त्याहीपेक्षा मला तो विचार करायला लावणारा प्रसंग वाटला. काही घटना या घडतात व आपण त्याबाबत बरेचवेळा दुःख किंवा आनंद व्यक्त करुन पुढे मार्गक्रमण करतो. परंतू प्रत्येकवेळी असे करु नये. काही घटनांचे विशेष संदर्भ असतात व त्याबाबत जरासा विचार केला तर आणि विशेषतः प्रसंग वेदनादायी असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न देखील करता येऊ शकतात. त्यासाठी वागण्यातले काही बदल, वातावरणात काही सुधारणा केल्यास आपल्याला अपेक्षित असे घडण्याची शक्यता असते. म्हणूनच विनय व वहिनींनी सांगितलेला प्रसंग मला विचार करायला लावणारा वाटला. गोष्ट तशी साधी व नेहमीचीच होती. त्यातल्या त्यात वहिनींना जरा जास्त वाईट वाटले होते. त्या प्रसंगामुळे संस्कारांवरच प्रश्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळी वायरलेस रेडीयोवरचा मेसेज सर्वजण ऐकत होते. रात्र झाली असली तरी देखील डोळ्यांना झोप नव्हती. मेसेज ऐकून त्यांना तर काय वाटत असावे याचा अंदाज अनेकांना येऊच शकत नाही. पण त्या समुहात मात्र धक्का किंवा दुःख याच्या पलीकडे निर्माण झालेला निर्विकारपणाच ठळकपणे प्रत्येक चेहेऱ्यावर दिसत होता. बोलण्याची इच्छा कुणाचीही होत नव्हती.. पण वायरलेस रेडीयो वरची बातमी त्यांच्यापैकी कुणालाही हादरवून वगैरे टाकत नव्हती.. रोजच तश्या बातम्या ऐकाव्या लागायच्या त्यामुळे मनात थोडेसे खट्...बस्स यापलीकडे काहीच नाही. बातमी होती- कल पुंछ सेक्टरमे पाकीस्तानी रेंजर्स द्वारा किये गये शेलींगमे सेना के दो जवान शहीद हो गये.. पाकिस्तान की तरफसे किये जाने वाले इन हरकतों का सेना की तरफ से मुँ तोड जवाब दिया जायेगा ऐसा ऐलान सरकार की तरफ से... मेजरने रेडीयो बंद केला.. करड्या आवाजात तो म्हणाला, बॉईज कल पुंछ मे अटॅक हुवा इसका मतलब आज शायद अपने रजौरीमे मुव्हमेंट हो सकती है, अल्टरनेट प्लान लग रहा है.. बी अलर्ट! डोन्ट टेक रीस्क अॅन्ड स्टे कनेक्टेड.. नो एक्स्ट्रा अॅडव्हेंचर.. गॉट इट? असा आदेश देऊन तो बंकरच्या दुसऱ्या बाजुला जाऊन

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

Image
बी.टी. सरांची आनंद व्याख्या एखादा वक्ता श्रेष्ठ का असतो? या प्रश्नाची अनेक उत्तरे राहू शकतात. त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे, प्रभावी सादरीकरणामुळे, विषयाच्या मांडणीमुळे, अभ्यासपूर्ण विवेचनामुळे किंवा कधी कधी आक्रमकतेमुळे देखील वक्ते व्यासपीठ गाजवीत असतात. परंतू वक्ता खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो तो वेगवेगळ्या विषयावरील त्याच्या मुलभूत चिंतन प्रक्रीयेमुळे. नवा किंवा वेगळा विचार करण्याची क्षमता असलेला वक्ता आपल्या प्रदीर्घ चिंतनातून आपल्याला जे सांगतो ते केवळ बुद्धीसाठी नसते तर ते आपल्या ह्रदयापर्यंत पोहचून जीवनदर्शक तत्व देखील बनू शकते. सकारात्मक चिंतनाचे पाठबळ असले की श्रेष्ठ दर्जाचा वक्ता वेळेवर देखील फार सुरेख विवेचन करुन संबंधित विषयांचे नवनविन पैलू श्रोत्यांसमोर उलगडून दाखवित जातो व त्या शब्दामृताच्या सरींमधे आपण चींब भिजून तृप्त होतो. अश्याच प्रकारचे विवेचन नुकतेच ऐकण्याचा योग आला.. ते देखील वक्तादशसहस्त्रेषु प्रा. बी. टी. देशमुख सरांकडून.. निमित्त होते अमरावती येथील दै. हिंदुस्थान या वृत्तपत्र समुहाद्वारे काढण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या विमोचनाचे...दरवर्षी हा दिवाळी अंक विमोचन

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सखी त्या दिवशी वनात रात्री अधिकच गडद काळोख होता. दूरवर हिंस्त्र श्वापदांच्या ओरडण्याचाही आवाज येत होता. वनवासाच्या जीवनाची आता त्या सर्वांना सवय झाली होती. पाच शुर पतींची पत्नी असली तरी देखील तिचे मन रात्रीच्या वेळी त्या घनघोर अरण्यात बावरल्यागत व्हायचे. परंतू आज मात्र पांचाली शांतपणे झोपडीच्या बाहेर टीपूर चांदणे न्याहाळत होती. त्या भयावह अंधारातही आज ती संपूर्णपणे भयमुक्तपणे एका खांबाला टेकून बसली होती. आज तिच्या मनाला भयाचा किंवा नेहेमीच्या अनामिक हुरहुरीचा स्पर्शही नव्हता कारण तिच्या समोर दुसऱ्या खांबाला टेकून तिचा सखा, वासुदेव कृष्ण बसला होता. आज मुद्दाम पांडवांना भेटायला तो आला होता. आता मात्र त्याला ठाऊक होते की त्याच्या सखीला त्याच्याशी बोलायचे होते. धर्मराज, पार्थ व भीम झोपडीत पहुडले होते आणि नकुल व सहदेव दूरवर गस्त देत होते. सख्यासोबत काही वेळ त्या नीरव शांततेत बसल्यावर पांचालीने त्याला एक प्रश्न विचारला...वासुदेवा, माझ्या सख्या, काय हे भोग आमच्या नशीबात आलेत.. किती संकटे, किती अवहेलना, केवढी विटंबना, केवढा अपमान... हे सारे काही कल्पनातीत आहे..परंतू मी हे सारे सहन करु शकले क

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळीची विशेष आवरासावर या दिवाळीच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम ठरवू नका, मला घराच्या आवरासावरीसाठी मदत हवी आहे असा आदेश मला गृहखात्याकडून प्राप्त झाला व त्यामुळे त्या आदेशाबरहुकूम मी कामावर हजर झालो. एरवी इतरांना कामे सांगून व्यवस्था चालविणे हेच माझे काम असले तरीदेखील या हुकुमासमोर मला माझा नेहेमीचा पवित्रा सोडून भव्य आवरासावर करण्यासाठी सज्ज व्हावे लागले. या असल्या आवरासावरीचे प्रकार सध्या दिवाळीनिमीत्त सर्वच घरांमधून सुरु आहेत. हे काम फारच वेगळ्या प्रकारचे असते. ही कामे करण्याचे कॉपीराईट गृहखात्याकडे असतात. त्यांच्या काही पद्धती वर्षानु वर्षे किंवा पिढ्यान पिढ्या ठरलेल्या असतात. या खास पद्धती खास करुन महिलांच्याच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत केलेल्या असतात. त्याच पद्धतींनुसार आपल्याला ती कामे करावी लागतात. कामकरी वर्गांचे अधिकार देखील पुरुषांच्या पिढ्या हस्तांतरीत करीत असतात. त्यामधे आपण आपल्या विचारानुसार विचार किंवा सल्ले द्यायचे नसतात. निमूटपणे आज्ञांचे पालन करावयाचे असते. उदाहरणच द्यायचे झाले तर अस्मादिकांचेच देता येईल. प्राचार्य म्हणून एखाद्या महाविद्यालयाचे संच

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
थकलेली अंबाबाई या वर्षी दसऱ्याचा दुसरा म्हणजे मोहरमचा दिवस. जवळपास अकरा दिवसांनंतर मी अंबामातेच्या मंदीरासमोरील रस्त्यावरुन माझ्या महाविद्यालयात निघालो होतो. गेले दहा बारा दिवस हा रस्ता नवरात्रीमधील भक्तांच्या अलोट गर्दीमुळे बंद करण्यात आला होता. दहा दिवस या रस्त्यावर पादचारी भक्तच ये जा करीत होते. वाहनांना परवानगीच नव्हती. संपुर्ण रस्त्याच्या दोन्ही कडेला वेगवेगळी दुकाने, रस्त्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून भक्तगणांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. रोषणाई करण्यात आली होती. अंबामातेचे मंदीरही रोषणाईने सजविण्यात आले होते. वर्षातून एकदाच नवरात्रीचा सण साजरा केला जात असल्याने संपुर्ण सोहळा दिमाखदार करण्यात आला होता. दिवसभर वेगवेगळ्या गावांवरुन व मूळ अमरावतीचेही अनेक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत होते. पहाटे पाचला उठून, अनवाणी पाच पाच किलोमीटर चालत, नऊ दिवसांचे कडकडीत उपवास करुन मोठ्या भक्ती भावाने हे दर्शन घेणे सुरु होते. काहींनी तर सलग दहाही दिवस सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेज आरतीपर्यंत अंबामाता आपल्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
बापालाही मन असतं मागल्या आठवड्यात माझी स्कुटर सर्विसींग करण्यासाठी मी शोरुमला घेऊन गेलो होतो. लवकर नंबर लागावा म्हणून अगदी सकाळीच मी तेथे पोहोचलो. माझ्यासोबत अजूनही काही मंडळी तेथे स्कुटरच्या सर्विसींग करीता आले होते. परंतू एक व्यक्ती मात्र वेगळ्या कारणासाठी तेथे आली होती. ग्रामीण भागाला शोभेल असा पोशाख, त्याच पद्धतीचे किंचितसे भांबावलेपण, हातात झोरा (ज्याला शहराच्या मराठी भाषेत बॅग असे म्हणतात), तो झोरा हातात घट्ट पकडलेला व चेहेरा जरा चिंताक्रांत अश्या स्वरुपाचा तो माणूस अस्वस्थपणे येरझारा करीत होता. त्याला खरे तर शोरुम मधे काम होते, परंतू तिकडची मंडळी आलेली नसल्याने तो सर्विसींग विभागातच तेथील लोकांशी बोलत बसला होता. शोरुम उघडायला अजून वेळ आहे, तुम्ही खूपच लवकर आले असे त्या लोकांनी त्या माणसाला सांगितले. दादा, वेळ नाही झाला पायजे.. म्हनून पायटीच निंगालो गावाकडून, गाडी लवकरच आली..म्हनून येऊन गेलो.. आज आपलं काम झालं पायजे..आजचा दिवस गाठायचा म्हनून तर सारी धावपळ केली.. आज काम झालंच पायजे...पैशे सारेच घेऊन आलो मी..आता चिंता नाई...ठरल्यासारखं सारं झालं म्हंजे जमलं...अश्या पद्धतीच्या त्य

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सो व्हॉट सो व्हॉट हा इंग्रजी भाषेतील उद्गार बरेच वेळा मुक्त विचारसरणीचे द्योतक मानला जातो. मी एखादी कृती करतोय व ती कृती समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनातील सांस्कृतिक किंवा सामाजिक चौकटीच्या पलीकडची वाटल्याने माझ्या कृतीवर जेव्हा आक्षेप घेतला जातो तेव्हा माझ्या दोन प्रकारच्या प्रतिक्रीया राहू शकतात. एक तर मला तो आक्षेप पटू शकतो व माझी चूक लक्षात आल्यामुळे मी -आय ॲम सॉरी - हा उद्गार काढतो. दुसऱ्या बाजूने माझी कृती मला स्वतःला योग्य वाटते व त्या कृतीबद्दल मी मनापासून समाधानी असेल तर मग केवळ समोरच्या व्यक्तीच्या चौकटीत ती बसत नाही म्हणून मी त्या व्यक्तीचा आक्षेप स्विकारणार नाही व त्या आक्षेपाबाबत - सो व्हॉट- असा उद्गार काढून माझा विरोध नोंदवीन. या -सो व्हॉट- उद्गाराचे एक आणखी वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा उद्गार काढण्यासाठी आत्मविश्वास लागतो. स्वतःचे स्वतः बद्दल कोणतेही ठाम मत नसलेल्या व दुसऱ्यांच्या विचारांनी आपल्या जीवनाच्या दिशा सहजच बदलविणाऱ्या पापभिरु व्यक्ती असा आत्मविश्वासाने भरलेला उद्गार कधीच काढू शकणार नाही. माझ्या जीवनातील निर्णय माझे आहेत, ते मी माझ्या मेंदुमधे सकारात्मकतेने क