My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
संवेदनशील मन आठव्या वर्गात गेलेल्या त्या लहानग्याचे आजोबा त्याला उन्हाळ्यात सोडून गेले. गेले अनेक दिवस त्याचे आजोबा आजारी होते. एक दुर्धर आजार झाला होता त्यांना. त्या आजारामुळे त्यांना फार त्रास व्हायचा. बरेच वेळा दवाखान्यात न्यावे लागायचे. आजारामुळे आजोबा कायम घरीच असायचे व या लहानग्याला त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची खूप सवय झाली होती. शाळेतून आल्यावर आजोबांशी शाळेतील गंमती जमती बद्दल गप्पा मारणे, रात्री आजोबांसोबत बसून त्यांच्याकडून गोष्टी ऐकणे, आजोबा पलंगावरच असल्याने त्यांना काही लागले तर बघणे, शाळेत जाताना आजोबांना मस्तपैकी बाय आबा म्हणून जाणे असा त्याचा दिनक्रम होता. आजारी असले तरी आजोबा आपल्या घरातील महत्वाची व्यक्ती आहेत हे त्याला सतत जाणवायचे. याचे कारण घरातील सर्व जण आजोबांची खूप काळजी घ्यायचे. विशेषतः या बाळाचे आई वडील त्यांना फार जपायचे. आपल्या आजोबांसाठी आपले आई वडील कसे झटतात हे तो पोरगा बघत असायचा. आजोबांचे पाय चेपून देणे, आजोबांना दवाखान्यात नेणे, त्यांची औषधे आणणे, त्यांच्याजवळ दवाखान्यात बसून राहणे, त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालणे, त्यांची सेवा करणे