My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
एकटी दिवसभराची सगळी धावपळ करताना मला काही नाही वाटत परंतू सायंकाळ झाली की मन खिन्न व्हायला लागतं. उगाचच हुरहुर वाढते. दिवसभराच्या कामांमधे लोकांसोबत वावरत असताना आठवणही येत नाही. परंतू दिवेलागणीच्यावेळी मात्र हमखास आठवण येते. सायंकाळी घरात कुणीच नसतं. मोठा मुलगा तर त्याच्या नोकरीच्या निमित्ताने परगावीच आहे. लहान मुलगा त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. देवापुढे दिवा लावून झाल्यावर दिवाणखान्यातील त्या फोटोसमोर उदबत्ती लावताना मात्र डोळे पाणावतात. मग त्या फोटोशीच बोलते आणि एक प्रश्न रोज नित्य नियमाने विचारते, मला एकटीला सोडून पुढे का निघून गेलात? अश्या प्रकारे जाण्याचे काय वय होते का तुमचे? चाळीसाव्या वर्षी माझ्या पदरी दोन लहान लहान मुले, आमच्या चरीतार्थाला लागणारी गुंतवणूक आणि हे घर सोपवून तुम्ही निघून गेलात.. या मोठ्या घरात सायंकाळच्या वेळी एकटे बसून रोज हे विचार माझ्या मनात येतात. हे असताना कशी असायची संध्याकाळ माझी... झर्रकन् मन भूतकाळात गेले. सायंकाळ म्हणजे धावपळीचा काळ. साहेब आता थोड्याच वेळात कार्यालयातून घरी येणार. त्यांच्या आधी मुले येणार. घराच्या फाटकापासूनच आईच्या नाव