My article published in Hindusthan Daily under थोडा है थोडे की जरूरत है
वैचारिक आंदोलने.. सध्या आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरु आहेत. अचानक आपला समाज जागरुक झाला की ही मुळातच असलेली जागरुकता माध्यमांच्या मदतीने प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागली आहे हा देखील एका वेगळ्या चर्चेचाच विषय असू शकतो. परंतू ही एक चांगली नांदी आहे. जुन्या आणि नव्या विचारांच्या चर्चांमधूनच आपण भविष्यात एका चांगल्या आणि पोषक समाज व्यवस्थेकडे अग्रेसर होऊ. सध्याची मात्र एक फारच वेगळ्या प्रकारची संक्रमणावस्था प्रत्येकजण अनुभवतो आहे. प्रभावी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने एखाद्या विषयावरील दोन्ही बाजुचे विचार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या हे विचार प्रगटीकरण आपल्याला थोडेसे भडक, अतिरंजीत किंवा आत्मकेंद्री वाटत असले तरी हळूहळू या सर्व विचारमंथनाला एक दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विविध चर्चांमधून खरा समाजोपयोगी आधार निर्माण होऊ शकेल. अनेकांना सध्या या सर्व चर्चा वायफळ व वेळ वाया घालविणाऱ्या वाटत असतीलही परंतू त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपल्याला जाणवेल की या चर्चा विविध विषयांमधील लोकांचा सहभाग वाढवित आहेत. या सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढून देशाच्या विविध योजनांमधेही