Posts

Showing posts with the label त्यांना सोडावे लागेल

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.03.23

Image
त्यांना सोडावे लागेल .. भगवतगीतेमधे विद्यार्थ्यांचे गुण सांगताना असे सांगण्यात आले आहे की त्याने आपल्या घराचा त्याग करून गुरु कडे शिक्षा ग्रहण करण्यास गेले पाहिजे . आताही अनेक मुले बारावीचे शिक्षण झाले की मोठ्या शहरात शिक्षणाकरीता जातात . आधुनिक काळात याचा एक आणखी नवा अर्थ लागू करण्याची गरज आहे . तो म्हणजे मुलांना आपण दिलेल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून त्यांना जगाचा थेट सामना करण्याकरीता तयार करणे . आई वडीलांनी जो कम्फर्ट झोन मुलांकरीता बनवून दिला असतो त्याच्या बाहेर पडल्याखेरीज किंवा आई - वडीलांनी त्यांना बाहेर पडू दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाचा खरा विकास होत नाही . त्याकरीता निश्चितच मनावर दगड ठेवायला लागतो . परंतू असे केल्याशिवाय जमत नाही . अश्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेल्या माझ्या मुलीच्या बाबतीत कालची सायंकाळ मला अस्वस्थ करून गेली . पण शेवटी मात्र हेच जाणविले की निर्णय योग्य होता . सायंकाळी महाविद्यालयातून परत आलो आणि पुण्याहून मुलीचा फोन आला की तब्येत...