My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
समारंभ..पद्धत महत्वाची की आनंद? आपल्यापैकी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या समारंभामधे सहभागी होत असतो. समारंभांमधे सहभागी होणे आपल्यापैकी प्रत्येकालाच मनापासून आवडत असते. कारण समारंभांमधून अनेकांच्या भेटी होतात, गप्पा होतात ज्या एरवी कामाच्या रगाड्यात राहून गेलेल्या असतात. म्हणूनच समारंभ हे मोठ्या उत्साहात साजरे करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. अर्थात हीच पद्धत जगभरात आहे. किंबहुना समारंभ साजरे करण्यामागील खरी भूमिका देखील तीच असते. परंतू कधी कधी या समारंभ साजरे करण्याच्या पद्धतींमुळे समारंभ किती तणावग्रस्त होऊ शकतात याचा अनुभव नुकताच मी एका लग्न समारंभात घेतला. समारंभातील पद्धतींवरुन दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला जाऊन तो समारंभच रद्द होतो की काय असे वाटू लागले. सुदैवाने तसे झाले नाही परंतू सर्वांची एकमेकांबद्दल मने मात्र कलुषित झाली आणि ज्या दोन जीवांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती ती दोघे कावरी बावरी होऊन विषण्ण मनाने तो सारा प्रकार बघत राहीली. ते सारे बघून मला एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न पडला. समारंभामधे पद्धत महत्वाची की आनंद? सामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर आनंद हेच असायला